मुंबईत मुसळधार पावसाची सुरुवात, राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी!

मुंबई आणि इतर उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. दादर परिसरात सकाळपासूनच रिमझिम पाऊस पडत आहे. यंदाच्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याचे दिसत आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या भागात मुसळधार पावसाचा सांगितला आहे.

body 90

मान्सूनची दमदार सुरुवात

राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल झाला आहे. मुंबईतही मान्सूनची दमदार सुरुवात झाली आहे. शुक्रवार सकाळपासून मुंबईत पाऊस सुरु आहे. राज्यातील एकूण १६ जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

पावसाचा यलो अलर्ट

विदर्भातील यवतमाळ, वर्धा, अमरावती, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच रत्नागिरी, पुणे, ठाणे, अहमदनगर, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर आणि नाशिक या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. मान्सून वेळेवर आल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे.

मुंबई आणि इतर उपनगरांमध्ये पावसाचे दृश्य

मुंबई आणि बाकी उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. दादर, कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर आणि गोरेगाव परिसरात पाऊस पडत आहे.

body 89

कोकणातील पावसाची स्थिती

कोकणातील रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने १६ जूनपर्यंत मुसळधार पावसाची सांगता केली आहे. पहिल्या 15 दिवसांत 1500 mm पावसाचा टप्पा पार झाला आहे, ज्यामुळे धरणांच्या पाण्याची पातळी वाढली आहे.

रत्नागिरीमध्ये दरड कोसळली

रत्नागिरीतील राजापूरमधील अणूस्कूरा घाटात दरड कोसळल्याचे कळत आहे. हा घाट कोकणातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अगदी जवळचा घाट आहे. पावसाच्या सुरुवातीला दरड कोसळून वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोसळलेली दरड हटवून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरु आहे.

जळगावमध्ये पावसाचा तडाखा

जळगाव शहरामध्ये मान्सूनच्या दुसऱ्या फेरीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. या अधिकच्या पावसामुळे दुकानदार व नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. जळगाव शहरातील छत्रपती क्रीडा संकुल व इतर अनेक दुकानांमध्ये पाणी गेले आहे. रस्त्यांवर तलाव झाले आहेत आणि काही ठिकाणी रस्त्यांनी नद्यांचे स्वरूप घेतले आहे. वृक्ष उन्मळून विजेच्या तारांवर कोसळल्यामुळे जळगावच्या आर आर विद्यालय परिसरात वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.

शेतकऱ्यांची तयारी

मान्सून वेळेवर आल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे. पावसामुळे जमिनी ओलावल्याने शेतकऱ्यांना पीक पेरणीसाठी अगदी अनुकूल असे वातावरण झाले आहे.


हे ही वाचा – डोंबिवली एमआयडीसीतील दोन भीषण आगींनंतर कंपन्यांचे स्थलांतर: पुढे काय होणार?

Leave a Comment